संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
दि.१०सष्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेचे सुमारास चांदेकसारे परीसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असल्याने परीसरात अतिवृष्टि जन्य परीस्थिती निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज सायंकाळी पाच वाजेसुमारास अचानक घारी,डाऊच,चांदेकसारे,जेऊर कुंभारी झगडेफाटा,आनंदवाडी,या पंचक्रोशीत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तासभर चालेल्या पावसाने नागरीकांची पुरती धांदल उडाली होती.चांदेकसारे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असुन घरातील संसार उपयोगी वस्तु भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाकाची वेळ असल्याने गृहीणींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
सदर घटनेची माहीती माजी सरपंच केशवराव होन यांनी कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली माहीती मिळताच तातडीने तहसिलदार घटनास्थळी हजर झाले व जेसीबी मशिनच्या सहाय्याने गावातील सखल भागातील पाणी नदीपात्रात काढण्यात आले.घारी व चांदेकसारे या दोन्ही गावा दरम्यान असणाऱ्या घारी नदीच्या पुलावर पाणी असल्याने तहसिलदारांना घारी गावात पहाणीसाठी जाता आले नाही.
माजी सरपंच केशवराव होन व तहसिलदार योगेश चंद्रे साहेब यांनी अश्या बिकट परीस्थित तत्परता दाखवुन ग्रामस्थांना या संकटातुन बाहेर काढल्याने नागरीकांन मधुन त्यांचे कौतुक होत आहे.